Wednesday, August 31, 2016

जीवन खुप सुंदर आहे

*मृगाकडे कस्तुरी आहे*.., *फुलात गंध आहे*..,

*सागराकडे अथांगता आहे*..,

*माझ्याकडे काय आहे*..? *असं म्हणुन रडू नका*..,

*अंधाराला जाळणारा १ सुर्य तुमच्यातही लपलाय*.
*आव्हान करा त्या सुर्याला* !!

*मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिजं घेऊन*,
*अंधारमय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून*.

*मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,उत्साह-ध्येयाने भरून*...!!

" *जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं जगायला हवं*...

Tuesday, August 30, 2016

*प्रेम म्हणजे काय असते


💕💕💕💕💕💕💕💕
एका गावात एक मध्यमवर्गीय पती पत्नी राहात असतात. नुकतेच लग्न झालेले. मात्र एंजॉय करण्याच्या त्या दिवसात आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने हौस मौज, सिनेमा इत्यादी त्यांच्यासाठी अशक्यच होते. तरी एकमेकांवर नितांत प्रेम असल्याने संसार सुरळीत सुरू असतो. पत्नी दिसायला सुस्वरूप, केस तर इतके सुंदर आणि लांब होते की साक्षात सुकेशिनी !!
एकेदिवशी कामावर निघण्याची तयारी करताना अचानक पतीच्या घड्याळाचा पट्टा तुटला आणि घड्याळ जमिनीवर पडून बंद पडले. इतक्यात पत्नी त्याला "टाटा" करायच्या निमित्ताने आलेली असते, ती म्हणते, "अहो, माझा कंगवा सकाळीच तुटलाय. तुम्ही येताना नवीन घेऊन येता का ?"
यावर पती खिन्न आवाजात म्हणतो, "आधीच महिनाअखेर आहे. त्यात आजच माझ्याही घड्याळाने मान टाकलीय. तरी पाहतो प्रयत्न करून तुझ्या कंगव्यासाठी"
लांब केस असल्याने साधा कंगवा तिला उपयोगी नसायचा. थोडा भारीचा घेतला तरच केस विंचरणे सोपे जायचे. पण ?? महिनाखेरने सगळ्या विचारांवर पाणी पडले. ती नकळत थोडीशी दुःखी झाली.
तोही बिचारा खालमानेने कामावर गेला. दिवसभर तो बेचैन होता. प्रिय पत्नीचा कंगवा की आपले घड्याळ ?? व्दिधा मनस्थिती झालेली. शेवटी घरी निघताना तो घड्याळाच्या दुकानात जातो, आणि ते घड्याळ आहे त्या परिस्थितीत विकून टाकतो. आलेल्या पैश्यातून एक सुंदर कंगवा शिवाय तिच्या आवडीचे सुवासिक वासाचे तेल घेऊन तो निघतो.
घरी येतो, पत्नी दार उघडते, आणि त्याला धक्काच बसतो.
कारण तिने आपले इतके सुंदर केस चक्क कापून लहान केलेले दिसतात. त्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे पाहून ती सांगू लागते.
"अहो, नेंहमी या केसाचा हा खर्च आपल्याला परवडणार आहे का ? शिवाय हल्ली पार्लरमध्ये लांब केस विकत घेतात हे कळले. म्हणून आज दुपारी जाऊन केस कमी केले. आता खर्चही वाचला आणि काही रुपयेही मिळाले. त्यातून तुम्हाला एक साधेच पण नवीन घड्याळ आणले आहे. हे घ्या"
तिच्या हातून नवीन घड्याळ घेताना तो गहिवरला. काही न बोलता त्यानेही पिशवीतून तिच्यासाठी आणलेला कंगवा आणि तेल तिला दिले. आता मात्र तिला हुंदका आवरेना !! ती मुसमुसत म्हणाली, "केस कायमचे गेलेले नाहीत. पुन्हा वाढतील की, तुमचा कंगवा वाया जाणार नाही"
आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत घट्ट सामावले.
मन हलके झाले होते आणि दोघांचे डोळे मात्र नकळत पाझरत होते !!
***** :---- पती पत्नीच्या प्रेमामध्ये आर्थिक परिस्थिती हे कारण कधीच दुःखाचे ठरत नाही. ठरू देखील नये. त्याने तिची भावना जपावी, तिने त्याचे मन ओळखावे. सुंदर जगण्याला अजून काय हवे ???

Monday, August 29, 2016

विचार धारा

एक विदेशी महिला ने विवेकानंद से कहा - मैं आपसे शादी करना चाहती हूँ"।
विवेकानंद ने पूछा- "क्यों देवी ? पर मैं तो ब्रह्मचारी हूँ"।

महिला ने जवाब दिया -"क्योंकि मुझे आपके जैसा ही एक पुत्र चाहिए, जो पूरी दुनिया में मेरा नाम रौशन करे और वो केवल आपसे शादी करके ही मिल सकता है मुझे"।
विवेकानंद कहते हैं - "इसका और एक उपाय है"
विदेशी महिला पूछती है -"क्या"?

विवेकानंद ने मुस्कुराते हुए कहा -"आप मुझे ही अपना
पुत्र मान लीजिये और आप मेरी माँ बन जाइए ऐसे में आपको मेरे जैसा पुत्र भी मिल जाएगा और मुझे अपना ब्रह्मचर्य भी नही तोड़ना पड़ेगा" महिला हतप्रभ होकर विवेकानंद को ताकने लगी और रोने लग गयी,

ये होती है महान आत्माओ की विचार धारा ।

"पूरे समुंद्र का पानी भी एक जहाज को नहीं डुबा सकता, जब तक पानी को जहाज अन्दर न आने दे।


ये होती है महान आत्माओ की विचार धाराइसी तरह दुनिया का कोई भी नकारात्मक विचार आपको नीचे नहीं गिरा सकता, जब तक आप उसे अपने अंदर आने की अनुमति न दें।"

मनाचे सामर्थ्य

 मित्रांनो मनात प्रचंड प्रमाणावर सामर्थ्य असते, त्यास प्रकट करणे आपल्याच हातात असते.

गुजरात मध्ये 2001 साली झालेल्या भुकंपात वर्षभर लकव्याने अंथरूणावर खिळून राहिलेला रोगी समोर इमारती पडताना पाहून उठून जोरात पळत सुटला ही ताकत आली कोठुन ?

मनाच्या अंतरंगात प्रचंड ऊर्जा असते. मानसिक विचार हा आत्मप्रतिमा - स्वप्रतिमा तयार करत असतो. या आत्मप्रतिमेला सकारात्मक विचारांच्या आधारे सबल करता येते. कधी कधी या आत्मप्रतिमेला अज्ञानाने आपणच दुर्बल करून नैराश्याकडे जात असतो.

एक शेतकरी होता, त्याचा भोपळयाचा मळा होता. सहजच गंमत म्हणून त्याने वेलावर लटकणार्‍या एका लहानशा भोपळयावर एक काचेची बरणी बांधली, भोपळे काढताना त्यांना लक्षात आले कि बरणीतील भोपळा फक्त बरणीच्याच आकाराएवढाच वाढला. भोपळयाला ज्या मर्यादांनी आपण सिमित केले, त्या पलीकडे त्याची मजल जाऊच शकत नव्हती.

मनाचेही असेच होते. संकुचित व स्वार्थी - अशुध्द मन - दुर्बल असते. मनात काय विचार चाललेत - मन स्वतःबदद्ल किंवा एखादया घटनेबदद्ल काय विचार करत आहे यावर त्या कार्याची यशस्विता अवलंबून असते.

विचार शरीरात अनेक प्रकारचे स्त्राव व तरंग निर्माण करतो. एका माणसाला मृत्यूदंडाची शिक्षा दयावयाची होती. त्याच्यासमोर नाग आणला व त्या माणसाचे डोळे बांधून त्याला दोन पिना टोचल्या. नाग आपल्याला चावला या भितीनेच त्याच्या शरीरात अनेक नकारात्मक स्त्राव (विष) तयार होऊन श्‍वासाची गती इतकी वाढली कि तो मृत्यूमुखी पडला. नुसत्या दोन पिना तर टोचल्या होत्या, पण भयप्रद विचारांनी त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले म्हणून विचारांवर लक्ष ठेवून नकारात्मक विचारांना सकारात्मक केल्यास दुःखमुक्तीच्या रस्त्यावरचा प्रवास सुरू होतो.

युध्दातील लढवय्या हत्ती म्हातारपणी चिखलात रूतला. बराच प्रयत्न करून बाहेरच येता येईना. शेवटी मनाने खचून खाली बसला. माहूताने अनेक लोकांच्या सहाय्याने वेगवेगळया दोर्‍या-काठया वापरून त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. तेथून गौतम बुद्ध जात असताना लोकांनी ही समस्या त्यांना सांगितली. बुद्धांनी लोकांना हत्ती हा पूर्वीचा युद्धलढवय्या असल्याने चिखलाच्या चारही दिशेला युद्धाचे वातावरण तयार करून युद्धनगारे वाजवण्याचा सल्ला दिला. या कृतीने नगार्‍याचा ध्वनी ऐकून हत्ती शरीराची हालचाल करून उठून जोरात मुसंडी मारून चिखलाच्या बाहेर पडला. हत्तीच्या आत चिखलातून बाहेर पडण्याची प्रचंड ऊर्जा मुळातच होती. फक्त तिला जागवण्याचे काम लोकांनी युद्ध नगार्‍यांच्या माध्यमातून केले.

म्हणून आपल्या आत असलेल्या प्रचंड ऊर्जेच्या स्त्रोताला जागवण्यासाठी सकारात्मक विचार करा व मनाची उभारी वाढवा.....

Friday, August 12, 2016

माणूस' म्हटलं की तो चांगलाही वागणार आणि वाईटही वागणार. सतत आयुष्यभर चांगल वागणारा, बोलणारा माणूस शोधणे अवघड आहे. चांगले आणि वाईट एका नाण्याच्या दोन बाजू असतात. आपल्यात चांगले किती व वाईट किती आहे, हे आपले आपल्याला कळत नाही. कुणी स्तुती केली की आपल्यातल्या चांगुलपणाचे दर्शन घडते, व आपण कुणाला वाईट, टाकून बोललो की दुस-या स्वभावाचे दर्शन घडते.
खरंतर अनेक चांगल्या गोष्टी असतात पण आपण मेंदूत वाईट गोष्टींचा भरणा भरपूर करत असतो. माणसं सहज काही बोलून जातात, आपल्या मनाला ते लागतं. आपण वेळीच ते झटकून टाकत नाही. आपल्या अंगावर झुरळ चढलं की आपण ते लगेच झटकून टाकतो. आपल्याला झुरळाची किळस वाटते. तसंच कोणी वाईट बोललं तर ते मेंदूत साठवून न ठेवता झुरळासारखं झटकून टाकता आलं पाहिजे.