Wednesday, February 24, 2016

विद्यार्थ्यांसाठी संमोहन एक परीस

आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे विद्यर्थीदशा असते. तसे आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो पण शालेय जीवन हे आपल्या आयुष्यतील महत्वाचे अंग आसते. शालेय जीवन हा फार मोठा काळ आहे. याच काळात आपण वयाच्या वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो.  याच काळात आपल्या जीवनाची, आयुष्याची जडण घडण होत असते. आपला स्वभाव, आपल्यातील गुण, अवगुण, जीवनाचे वेगवेगळे पैलू विकसित होत असतात. एकंदर पुढील आयुष्याच्या उभारणीसाठी हा काळ खूप महत्वाचा असतो. विद्यर्थीदशेतच शारीरिक बदलासोबत होणारे मानसिक बदल आपल आयुष्य बदलवून टाकतात.
माझ्या कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना अनेक गोष्टी लक्षात येतात. सर्वसाधारण विद्यार्थांच्या समस्या ह्या समान असतात जसे अभ्यासात लक्ष न लागणे, एकाग्रता नसणे, वाचलेले लक्षात न राहणे, चंचल मन, न्यूनगंड, अबोल स्वभाव, वाईट सवयी, भीती, ताण तणाव अश्या कितीतरी ... बऱ्याच वेळा कमी आत्मविश्वास किंवा इतर कुठल्यतरी कारणांमुळे होणारी कुचंबना मुलांना वाईट संगतीकडे ओढत नेते. त्यापायी कितीतरी मुले व्यसनाधीन झालेली असतात. पालकांना याची कल्पना पण नसते. माझ्याकडे आलेल्या पालकांची आपल्या मुलांबाबत कमी अधिक प्रमाणात ह्याच तक्रारी असतात.
आजपर्यंत  बऱ्याच पालकांनी आणि विद्यार्थांनी माझ्या कार्यशाळेत भाग घेऊन संमोहनाचा लाभ घेतलेला आहे. १० विचा किंवा १२ विचा निकाल लागला कि  मिठाई घेऊन येणारे, फोन करणारे पालक व विद्यार्थी पहिले कि मन प्रसन्न होऊन जाते. वर्गात जेमतेम पास होणारा मुलगा, उत्तम मार्गांनी पास झाल्याचे पालक अन्दाने सांगतात. भाषण  देण्याची भीती  वाटते सांगनारे मुले आज मोठ्या कंपनी मध्ये ट्रेनर म्हणून नौकरी करत आहेत. आत्मविश्वास वाढला असे सांगणाऱ्या मुलांचे फोन आल कि फार संतोष वाटतो.  व्यक्तिमत्व विकाससाठी संमोहन हे एक परिस आहे. संमोहनाद्वारे एकग्रता वाढवणे, स्मरणशक्ती विकसित करणे, भीती घालवणे, वाईट सवयींवर मत करणे अगदी सहज शक्य आहे. संमोहनातून आपले मनोबल वाढवणे अगदी सहज शक्य आहे कारण संमोहनात दिलेली प्रत्येक सूचना थेट अंतर्मनात उतरत असते.

Thursday, February 18, 2016

विचार

जीवनामध्ये आपल्यावर सर्वात जास्त प्रभाव हा आपल्या विचारांचा असतो. आपण जसे विचार करू, तसेच आपले व्यक्तिमत्व, स्वभाव घडत असते, तसेच आपण बनत असतो. आपल्या जीवनात आपल्या विचारांना अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या यशाची गुरुकिल्ली हि आपल्या विचारात आहे कारण मन हे विचारांचे धनी आहे. आपण कुठल्या परीस्थित काय विचार करतो, तसेच आपले निर्णय असतात. आपल्या मनात दोन प्रकारच्या विचार येत असतात एक सकारत्मक आणि दुसरे नकारात्मक. आपला प्रत्येक विचार म्हणजे एक तरंग (wave ) मानला तर  प्रत्येक तरंगाला त्याची उर्जा (Energy )  असते. आता तुमचा विचार सकारात्मक असेल तर तुम्हाला सकारत्मक उर्जा मिळेल आणि नकारात्मक असेल तर नकारत्मक उर्जा मिळेल.
मला कार्यशाळेत सर्वात जास्त लोकांनी विचारलेला प्रश्न म्हणजे " सकारात्मक विचार कसा करायचा ? " कारण दिवसभरात तुम्ही वेगवेगळ्या परिस्थिती हाताळत असता, त्यामुळे तुमच्या मनात दिवसभर सकारात्मक विचार येउच शकत नाहीत. हे मी पण मान्य करतो. हे खर आहे. माझा सर्वाना एक प्रश्न आहे तुमच तुमच्या स्वतःबद्दल काय मत आहे ? तुमच्या नौकारीबद्दल काय मत आहे ? मी खात्रीशीर सांगतो तुमचे स्वतःबद्दलचे विचार सकारात्मक नाहीत. नौकारीबद्दल तर नाहीच नाही. आधी स्वतःबद्दल चांगला विचार करायला शिका. कुणीही भेटले कि तुम्ही तुमच्या दुखाचा पाढा त्याच्या समोर वाचता, आपण कसे कमनशिबी आहे हे त्याला पटवून देण्यासाठी जीवाचा आटापिटा करता. तुमचेच विचार तुमची प्रगती थांबवतात. कारण जेंव्हा तुम्ही दुसऱ्यांना पटवून सांगत असता, तेंव्हा ते तुम्हाला पटलेलं असते आणि तेच आपल मन सत्य आहे हे समजून आमलात आणत असते. जर रोज तुम्ही स्वतःला चांगल्या स्वयंसूचना दिल्यात, तर तुमचे विचार चांगले होतील यात तिळमात्र शंका नाही.
मनात आलेला एक विचार तुम्हाला आनंदी किंवा दुखी बनवून जातो. आपली प्रगती, आपली अधोगती हे आपल्या विचारांची फळे आहेत. सकारात्मक विचाराने काय होऊ शकते, यासाठी बाजारात हजारो पुस्तके आहेत. पण प्रत्येक पुस्तक तुम्हाला हेच सांगेल, आधी स्वतःबद्दल चांगला विचार करा, तरच जग तुमच्याबद्दल चांगला विचार करेल.  चांगले गुण कसे वाढवता येतील त्यवर भर द्या. शाळेत आपण कच्या विषयाचा अभ्यास जास्त करायचो, पण जगाच्या शाळेत जे छान जमत, येते त्याला विकसित करा. कच्च्या गोष्टी सोडून द्या, कारण त्या कच्च्या गोष्टी आपल्या मनात जास्त नकारात्मक विचार निर्माण करतात, आपला आत्मविश्वास कमी करतात.
जर मनात एकसारखे नकारात्मक विचार येत असतील तर, थोडा वेळ श्वास रोखून धरा. जितका वेळ रोखून धरता येईल, तितका वेळ रोखून धरा. आपोआप विचार कमी कमी होत जातील. रोज झोपताना सकारात्मक कल्पना मनात घेऊन झोपा, तुमचे विचार सकारात्मक होत जातील. संमोहनात जाऊन स्वतःला सकारात्मक स्वयंसूचना द्या, तुमचे विचार सकारात्मक बनत जातील. तुमचे सकारात्मक विचार तुम्हाला रंकाचा राव बनवतील तर नकारत्मक विचार रावाचा रंक बनवतील. दिवसातून दहा वेळा I am the Best हे वाक्य पुटपुटा, काही दिवसात त्याची किमया तुम्हाला दिसेल. कुठलेही काम सुरु करताना काम यशस्वीरीत्या पूर्ण झाल्याची कल्पना करा, ते आपोआप यशस्वीरित्या पूर्ण होईल.

Thursday, February 11, 2016

संमोहनातून भीतीचे निर्मुलन

प्रत्येक माणसाला कसली ना कसली भीती वाटत असते. तस बघितलं तर भीती हि फक्त एक कल्पना आहे, तीच भौतिक अस्तित्व काहीच नाही. पण भीती हि कल्पना पण इतकी जबरदस्त प्रभावी आहे कि त्यामुळे भल्याभल्यांचे त्राण निघून जातात. भीती हा आपला खूप मोठा शत्रू आहे. आपण लहान असताना आई वडील,आप्तगण वेगवेगळ्या गोष्टींची भीती घालत असतात. नकळत आपलं अचेतन मन ते सर्व सत्य आहे असं समजत असते. आपण मोठे झालो तरी काही गोष्टींची भीती आपल्या मनात तशीच राहते. आजून माझे बरेच मित्र अंधाराला घाबरतात. त्याच कारण त्यानाही माहित नसते. आपल्या सभोवतालचे वातावरण पण नकळत काही गोष्टींची भीती आपल्या मनात पेरत असते.

प्रत्येकाच्या भीतीचे प्रकार वेगळे असतात. कुणाला कश्याची भीती वाटेल ह्याची आपण कल्पना सुधा नाही करू शकत. भीतीचे स्वरूप साधारण असेल तर ठीक आहे. पण जेंव्हा हि भीती वाढत जाते तेंव्हा आपले आयुष्य आणखीनच खडतर बनत जाते. माझ्या कार्यशाळेत आलेल्या लोंकाना भीती पासून सुटका हवी असते. कुणाला बसमध्ये बसण्याची भीती, कुणाला लिफ्टमध्ये जाण्याची भीती, कुणाला गाडी चालवण्याची भीती, कुणाला काम करताना चुका होण्याची भीती. अश्या नानाप्रकारच्या भीतीने लोग ग्रासलेले असतात. अनेकांना त्यांना वाटणाऱ्या भीतीचे कारण पण माहित नसते. ते कारण त्यांच्या अंतर्मनात असते. कुठेतरी काही घटना घडलेली बघितलेली असते, काही ऐकलेले आसते, कधीतरी काहीतरी चूक झाल्यमुळे अपमान झालेला असतो अशी कितीतरी कारणे असतात.

माझ्याकडे एक तरुण आला होता. त्याला कुणाचे भांडण ऐकले, भांडण बघितले तरी दोन दोन दिवस शौचालय होत नसे.तो या प्रकाराला खूपच त्रासला होता. कारण २-३ दिवसात त्याला रस्त्यावर किंवा कुठेतरी कुणीतरी भांडताना दिसायचे. त्यांनी खूप औषध, चूर्ण घेतली पण कुठल्याही औषधांचा, चूर्णाचा त्यांना उपयोग झाला नाही. औषध घेतली कि आराम वाटायचं पण औषध बंद झाल कि त्रास चालू. शेवटी त्यांना माझा नंबर मिळाला आणि परवानगी घेऊन महाशय हजर. असे का होते विचारले तर ते पण माहित नाही. कधीपासून होते हे विचरले तर ते पण नक्की आठवत नाही. मग माझ्याकडे त्यांना संमोहनात घेऊन जाने हा एकाच पर्याय होता. संमोहनात गेल्यावर मी त्यांना हा त्रास कधीपासून होतो, का होतो याचे कारण शोधले. ते ६-७ वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांसोबत बसने त्यांच्या मामाच्या गावी चालले होते. त्यावेळी बस मध्ये जागेवरून वडिलांचे इतर लोकांसोबत बाचाबाची झाली. नंतर त्याचे रुपांतर भांडणात होऊन मारामारीवर आले. त्या भांडणात वडिलांना मार लागला. बसमधील लोकांनी ते भांडण कसे तरी सोडवले पण त्या घटनेचा परिणाम यांच्या मनावर झाला. तेंव्हापासून त्यांना हा त्रास चालू झाला. अगोदर त्रासाचे स्वरूप साधारण होते पण काही वर्षांनी हे वाढच गेले. त्यांच्या मनात बसलेल्या घटनेचा परिणाम मनातून संमोहनाद्वारे काढून टाकताच त्यांचा त्रास पण पूर्ण बारा झाला.

अश्या कितीतरी घटना आपल्या आयुष्यात घडत असतात. काही थेट अंतर्मनात उतरतात आणि त्याचे परिणाम आपल्याला त्रासाच्या स्वरुपात जाणवतात. आपल्यलाला त्याचे कारण पण माहित नसते. पण त्या अंतर्मनात साठवलेल्या असतात.

संमोहनाद्वारे मनात बसलेल्या अश्या घटनामुळे निर्माण झालेली भीती काढून टाकता येतात. त्या भीतीमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका करून घेत येते. कारण संमोहनात आपण थेट अंतर्मनाशी संवाद करत असतो.

संमोहन आणि मनाची एकाग्रता


आपल मन खूप चंचल आसते. ते कधीच एका विचारांवर / एका निर्णयावर टिकत नाही. एका दिवसात कमीत कमी सर्व साधारणपणे दहा हजार विचार आपल्या मनात येत असतात. नेहमीच आपण काम एक करतो आणि विचार वेगळा करतो. कुठलेही काम करताना मनाची एकग्रता साधता आली तर, काम कमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करता येते. काम करताना होणाऱ्या चुका टाळता येतात. त्या कामातील बारकावे लक्ष्यात राहता. विद्यार्थ्यांना  अभ्यास करताना मनाची एकाग्रता साधता आली तर आयुष्यात यश तुमचेच आहे. विद्यार्थ्यांनसाठी संमोहन हे एखाद्या परिससारखे काम करते. एकग्रतने केलेल्या अभ्यासाचे फायदे सांगायची गरज नाही.

फक्त मनाच्या चंचलतेमुळे आपले कितीतरी नुकसान होत असते. मनाची एकग्रता वाढवण्यासाठी खूप व्यायाम आहेत,  पण संमोहन हि सर्वात  सोपी पद्धत आहे. यांचे कारण म्हणजे संमोहनात थेट अंतर्मनालाच  सूचना दिल्या जातात. रोज स्वसंमोहनात जाउन एकाग्रतेसाठी सूचना घेतल्यास आपल्याला लवकरच खूप सुधारणा झालेली जाणवेल. शिवाय डोळे उघडे ठेऊन स्वसंमोहनात राहता आले तर पूर्ण एकाग्रतेने अभ्यास किंवा काम होईल.

माझ्या कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना संमोहनाचा झालेला लाभ मी नेहमीच अनुभवतो. तसेच वाईट सवयींवर मात करण्यासाठी सुद्धा संमोहनाचा खूप फायदा होतो.

रोज रात्री झोपताना " दिवसेंदिवस माझ्या मनाची एकग्रता वाढत जाईल " हे वाक्य पुटपुटत झोपलात तरी तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल. कारण झोपेत असताना आपले बाह्यमन झोपलेले असते पण अंतर्मन पूर्ण जागे असते.  त्यामुळे तो विचार थेट अंतर्मनात पोहोचतो.

Wednesday, February 10, 2016

संमोहनाबद्दल असलेले गैरसमज


आपल्याकडे संमोहनाचा प्रचार अजून हवा तसा झाला नसल्याने, संमोहनाबद्दल बरेच गैसमज समाजात प्रसारित आहेत. अनेकजण संमोहनाचा संबंध काळी विद्या, जादूटोणा, भानामती अश्या चुकीच्या गोष्टींशी जोडतात.  समजातील सर्व स्तरातील लोकांना संमोहनाबद्दल अपुरी माहिती आहे त्यामुळे संमोहनाचा उपयोग कसा होतो हेच त्यांना समजत नाही. लुबाडण्याचे, फसवणुकीचे प्रकार थेट संमोहनाशी जोडले जातात. वेगवेगळ्या माध्यमातून संमोहनाचे  परिणाम मसाला लावून दाखवल्यामुळे, संमोहनशास्त्र अधिकच बदनाम झाले आहे. माझ्या कार्यशाळेत येणाऱ्या लोंकाच्या मनात येणारे सर्वसाधारण  प्रश्न म्हणजे
१. व्यक्ती संमोहनकाराच्या आधीन होतो ?
२. संमोहनात गेल्यावर नॉर्मल परीस्थित वापस येता नाही आले तर ?
३. संमोहनात तुमच्या मनातील गुपिते काढून घेता येतात.
४. अंगावरचे मौल्यवान दागिने/ वस्तू काढून घेता येतात.
५. बँकेचे / ATM चा password काढून घेतला जातो.
६. स्त्रियांचा विनयभंग केला जातो. 
७. सुंदर मुलींना नादी लावता येते.
८. एखाद्याचा खून करायला लावता येतो.

परंतू असे काहीही करता येत नाही. कुठल्याही व्यक्तीला, व्यक्तीच्या संमती शिवाय,  इच्छेविरुद्ध संमोहित करताच येत नाहीसर्वात महत्वाचे म्हणजे जी गोष्ट जागेपणी करण्याची लाज वाटते ती गोष्ट संमोहनाच्या अवस्थेत देखील कोणीही कदापी करणार नाही. जे रहस्य तुम्हांला कोणालाही अगदी जवळच्या व्यक्तीलाही सांगावयाचे नाही ते संमोहनावस्थेत सुद्धा सांगणार नाही.

संमोहन म्हणजे एक झोपेसारखी अवस्था आहे. त्यामुळे संमोहनात गेलेली प्रत्येक व्यक्ती १००% संमोहनातून बाहेत येतेच. संमोहनकार जागे होण्याच्या सूचना देण्यास विसरला, तरीपण ती व्यक्ती आपोआप काहीवेळाने जागी होते. आजपर्यंत संमोहनातून बाहेर व्यक्ती बाहेर आली नाही असे  एकही उदाहरण या जगात नाही. 

संमोहनकाराच्या सूचनाच संमोहित व्यक्ती तंतोतंत पालन करत असते पण दिलेल्या सूचना मानसिक, भावनिक, आध्यत्मिक पातळीच्या विरुद्ध असल्यास संमोहित व्यक्ती ताबडतोब संमोहनातून बाहेर येते. संमोहित व्यक्ती कधीच संमोहनकाराच्या आधीन नसते. मनाविरुद्ध दिलेली कुठलीच सूचना संमोहितव्यक्ती पाळत नाही.  

इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती


माझ्याकडे एक गृहस्थ आले होते. ते शेअर बाजाराचा व्यवसाय करायचे आणि खूपच त्रासलेले वाटत होते. त्यांच्या बोलण्याचा एकंदरीत सूर हा नकारात्मक होता. त्यांना प्रत्येक गोष्ट त्रासदायकच वाटायची. बोलताना लक्ष्यात आल कि यांना शेअर बाजारात नफ्यापेक्षा नुकसान जास्त होते. याच कारण शोधल तेंव्हा लक्ष्यात आल कि ट्रेड करताना ते  नुकसान होण्याच्या भीतीमुळे भयानक अस्वस्थ व्हायचे. ती अवस्थता एवढी जास्त असायची  कि त्या भीतीमुळे ते योग्य निर्णय असून, इच्छा असून सुधा ट्रेड करत नसत आणि नंतर वेळ निघून गेल्यावर आपण ट्रेड केला नाही, आपल्याला फायदा झाला असता या विचार मुळे भयंकर चिडचिड करत. आपण मुर्ख आहोत, आपल्याला निर्णय घेत येत नाही, आपल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही यासारखे विचार दिवसभर डोक्यात थैमान घालायचे. याच विचरामुळे  त्यांचे ट्रेडिंग निर्णय पण चुकायला लागले. शेवटी परिणाम जो व्हायचा तोच झाला. वारंवार असाच विचार केल्यामुळे ते विचार थेट त्यांच्या अंतर्मनाने स्वीकारले आणि तसच त्याचं व्यक्तिमत्व बनल. याचाच अर्थ असा कि ट्रेड करायची इच्छा असूनही त्यांची नुकसान होण्याची कल्पना त्यांना हव ते करू देत नव्हती. इच्छाशक्ती पेक्षा कल्पनाशक्ती प्रभावी ठरत होती.

आपल्याही आयुष्यात असे बऱ्याच वेळेला होते. प्रंचड इच्छा असूनही फक्त नुकसान होण्याच्या कल्पनेने, लोक काय म्हणतील या कल्पनेने आपण अनेक सुवर्णसंधी सोडून देतो आणि नंतर पश्याताप करत बसतो. आपल्या जीवनात नेहमीच कल्पनाशक्ती इच्छाशक्ती पेक्षा प्रभवि ठरते. ज्या माणसाच्या आयुष्यात या दोन्ही शक्ती सोबत काम करतात त्यांची प्रगती झपाट्याने होते. ती यशाची शिखरे भरभर पार करत असतात.

कल्पनाशक्ती आपल्याला आपला कम्फर्ट झोन सोडू द्यायला तयार नसते किंवा रिस्क घेतल्यावर काय नुकसान होईल याच चित्र १०० गुणे जास्त नकारात्मक पद्धतीने समोर उभे करते. त्यामुळे आपण इच्छा असूनही निर्णय घेण्यास कचरत आसतो.

माझ्या कार्यशाळेत संमोहनाद्वारे  कल्पनाशक्ती सकारात्मक रूपाने कशी वापरायची, इच्छाशक्ती कशी प्रबळ करायची या गोष्टी मी प्रकर्षाने शिकवतो.

Tuesday, February 9, 2016

मानवी मनाबद्दल थोडेफार .......


मानवाच संपूर्ण जीवन हे मन या संकल्पनेन व्यापून टाकल आहे. आपला स्वभाव, वागणूक, व्यवहार, व्यक्तिमत्व हे आपल्या मनाच्या कार्यशाळेत येत. कुठल्याही प्रसंगामध्ये, प्रसंगानुरूप भावना निर्माण करण्याच महत्वाच काम मन करत असते. राग, भीती, आनंद, हर्ष ह्या सर्व भावना मनात प्रसंगानुसार तयार होतात. मानवच मन प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकत असत, घेत आसत ते आपल्यासाठी चांगल पण असेल किंवा वाईट पण असू शकत. वारंवार घडणाऱ्या गोष्टी मनावर खोल परिणाम करतात. काही गोष्टी नकळत मनात उतरतात आणि आपल स्थान पक्क करतात. 
मानवाला एकच मन असून त्याचे दोन कप्पे आहेत एक म्हणजे बाह्यमन अनु दुसरे अंतर्मन. प्रत्येक मनाच कार्य हे वेगवेगळी आहेत. या दोन्ही कप्प्यांमध्ये पुसट आशी रेषा आहे. दोन्ही कप्पे फार महत्वाचे आहेत. त्यांची कार्य हि परस्परांवर अवलंबून आहेत.

बाह्यमन हे चौकस आहे. आपल्यासाठी चांगले काय, वाईट काय हा सारासार विचार करण्याच कार्य त्याच्याकडे आहे. निर्णय घेणे, लॉजिक लावणे ह्या गोष्टी बाह्यमनाच्या कार्य क्षेत्रात येतात. आलेल्या विचाराना अंतर्मनाकडे पाठवण्याच काम हे बाह्यमन करत. पण एकूण मनाच्या १०% एवढाच कप्पा हा बह्यामानाचा आसतो. उरलेला सर्व ९०% भाग हे अंतर्मन असते.
  
अंतर्मन हे अफाट आहे, त्याची ताकत अफाट आहे पण त्याला चांगल काय, वाईट काय हे समजत नाही. सारासार विचार करण्याचे काम त्याचाकडे नाही. आपल बाह्यमन जे त्याला देईल ते सर्व अंतर्मन स्वीकारत आणि त्यानुसार कार्य करत. आपल्या आयुष्यतील सर्व घटनांच रेकॉर्डिंग आपल्या अंतर्मनात होत असते. प्रसंगानुसार भावना निर्माण करण्याच काम पण अंतर्मन करते. आपल्या शरीराच्या सर्व क्रिया अंतर्मन पार पडत. शरीरातील रक्ताभिसरण नियंत्रित ठेवणे, श्वासोच्वास चालू ठेवणे, शरीरात आलेल्या अन्नाला पचवणे व गरजेनुसार वेगवेगळ्या भागाकडून हवे तसे कार्य करून घेण्याच कार्य हे अंतर्मनाच आहे. एकंदर मानवाला सचेत ठेवण्याच काम हे अंतर्मन करत असते.


मन कस काम करते हे आपण बघू. आपण सर्वांनी Titanic हा सिनेमा बघितला असेल. त्या सिनेमा मध्ये जहाजाचा अपघात होतो आणि पुढचा सर्व अनर्थ ओढवतो. माझा प्रश्न जहाचा अपघात का होतो ? जहाजाच्या वर समोरच्याभागाची टेहळणी करण्यासाठी दोन गार्ड बसवलेले असतात. त्यांचा काम असते कि समोर काही अडथला दिसल्यास तशी सूचना अगोदर देणे आणि त्यांच्या सूचनेनुसार जहाजाच्या तळमजल्यातील कामगार काम करत असतात. जहाजाचे सर्व कार्य म्हणजे जहाज चालू ठेवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा हे कामगार हाताळत असतात. तळमजल्यातील कामगारांना जहाज कुठल्या दिशेने जाणार, समोर काय आहे हे काहीही माहित नसते कारण त्यांना ते दिसतच नसते. ते फक्त आलेल्या सूचनांच तंतोतंत पालन करत असतात. 

आपण पण एक जहाजस्वरूपी शरीर वागवत आहोत. शरीर सचेत ठेवण्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा हि आपले अंतर्मन हाताळत असते. त्याला बाहेरच्या जगाशी काही घेण- देन नसत.चांगल काय, वाईट काय हे समजत नाहीत. ते फक्त बाह्यमनाकडून आलेल्या सूचनांच पालन करत असते, त्या आमलात आणत आसते. बाह्य मानाने दिलेल्या सूचना / विचार सकारत्मक आहेत, नकारत्मक आहेत हे अंतर्मनाला समजत नाही. दोन्ही प्रकारच्या सूचना / विचार अंतर्मनासाठी सारख्याच असतात. दोन्ही प्रकारच्या सूचना ते तेवढ्याच प्रभविपणे आमलात आणत असते.

अंतर्मन सर्व सूचना विचार हे चित्राच्या स्वरुपात बघत असते. त्यामुळे अंतर्मनाला "नाही, नको" असे क्रियापद असलेले वाक्य चित्रात बदलता येत नाहीत. आपण एखद्या व्यक्तीला, एखादे काम करू नकोस असे वारंवार सांगूनही ती व्यक्ती तेच काम करते. आपल्याला हत्तीचा विचार करू नका असे सांगितले तरी आपण हत्तीचाच विचार करतो. कारण हत्ती म्हटले कि  हत्तीचे चित्र अंतर्मनात निर्माण होते पण "नका" या शब्दाचे काहीही चित्र निर्माण होत नाही. वारंवार येणारे विचार, भावनेच्या भरात येणारे विचार थेट अंतर्मनात जातात.

जर तुमचे सकारात्मक विचार अंतर्मनाला मिळाले तर ते सकारात्मक भावना निर्माण करेल आणि नकारात्मक मिळाले तर नकारत्मक भावना निर्माण होतील. सांगायचे तात्पर्य एवढेच कि अंतर्मनाला जसे विचार देऊ, तसे तुमचे व्यक्तिमत बनते.

Wednesday, February 3, 2016

मन असते का ?



सहज कुठेतरी वाचण्यात आले " जग जिंकायचे असेल तर त्या जगातील माणसे जिंका, माणसे जिंकायची आसतील तर त्यांची मने जिंका आणि त्यांची मने जिंकायची असतील तर त्याचं  मन   कसे कार्य करते  ते शिका आणि त्यांची मने कशी कार्य करतात हे शिकायचे असेल तर आपल मन कस कार्य करते हे समजून घ्या ". यावरून एकाच गोष्ट लक्ष्य येते, जगाला  जिंकायचे असेल तर आधी स्व:ताच्या मनाला जिंका.

आपण नेहमी म्हणतो कि मी आज खूप आनंदी आहे, खुश आहे किंवा दु:खी आहे. मला एक विचारावेसे वाटते, जेंव्हा ह्या भावना सांगत असता, त्यावेळी  या सर्व भावनांचा तुमच्या शरीरावर काही फरक पडतो का. म्हणजे आनंदी असता तेंव्हा शरीराला थंडी वाजते का, गर्मी होते का ? किंवा दु:खी असता तेंव्हा शरीराला खाज सुटणे असं काही होत का ? नाही ना. मग आनंद होतो तो कोणाला, दु:ख होते ते कुणाला.  मी म्हणजे कोण, तुमच शरीर की आणखी कुणी. लगेच तुमच उत्तर येईल , मी म्हणजे माझ मन.

माझ्या कार्यशाळेत मी अनेकांना विचारलेला प्रश्न " माणसाला मन असते का? " सर्व डोळे विस्फारून एकच उत्तर देतात " हो, असते ". माझा दुसरा प्रश्न " मन शरीराच्या कुठल्या भागात आसत, त्याचा रंग कुठला आहे, आकार कसा आहे ? " सर्वजण चूप.

आपल्याला मन आहे, पण ते कुठे आहे हे कुणालाच सांगता येत नाही. कुणी मन्हत ते डोक्यात आहे, कुणी सांगते ते हृदयात आहे असे वेगवेगळी उत्तरे ऐकायला मिळतात. सर्व जगाला माहित आहे कि मानवाला मन आहे, पण त्याच शरीरात स्थान कुठे यावर अनेक  मतभेद आहेत.  यावर खूप संशोधन झाली आणि चालू आहे.

वर सांगितल्या प्रमाणे सुख, दु:ख जेंव्हा ह्या भावना  निर्माण होतात, तेंव्हा त्या शरीराच्या विशिष्ट एकाच भागात निर्माण होतात का ? म्हणजे आपण आपला हात दुखतो, पाय दुखतो, डोक दुखते असे बोलतो पण फक्त माझा पाय आनंदी आहे, डोक आनंदी आहे असं  मी कधी ऐकल नाही.  आनंद होतो तो  शरीराच्या सगळ्या अवयवांना होतो तसेच दु:ख होते ते सुद्धा सर्व शरीराला होते. म्हणजे मन हि संकल्पना आपल्या शरीराच्या सर्व भागात आहे. आपल सर्व शरीर मन ह्य संकल्पनेन व्यापलेलं आहे.

निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे मानसाच मन. मनाची अफाट शक्ती ज्याला वापरता आली तो कुठल्याही परीस्थित प्रगती करतो. मानवी मन हे इतके अगाध आहे कि त्याचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र अभ्यासाच्या शाखा आहेत. हा झाला संशोधनाचा विषय.

शास्त्रानुसार मानवाला दोन प्रकारची मने असतात एक म्हणजे बाह्यमन आणि दुसरे अंतर्मन. एकूण मनाच्या १०% भाग हा बाह्यमनाने व्यापलेला आसतो तर ९०% भाग हे मानवाचे अंतर्मन असते. माणसाचे व्यक्तिमत्व, स्वभाव, वागणूक, आचार-विचार हे सर्व मनाच्या कार्यभागात येते. मानवाच्या जडणघड्नेत त्याच्या मनाचा मोलाचा वाटा असतो.

Monday, February 1, 2016

संमोहनाबद्दल थोडेपार



आजकालच्या काळात समाजामध्ये आता संमोहनाबद्दल बऱ्यापैकी माहिती झाली आहे. त्यापैकी काही शास्त्रीय तर काहीअशास्त्रीय ऐकीव माहिती सुद्धा आहे. संमोहन हे तसे भारतीय योग विद्येचे अंग पण परकियांच्या आक्रमणामुळे मागे पडले व परदेशात जाऊन विकसित झाले. संमोहनामध्ये तुम्हाला कृत्रिम झोपेत नेल जात ज्या मध्ये तुमच बाह्यमन पूर्णपणे झोपी जाते आणि सर्व संवाद हा आंतर्मानाशी चालू आसतो.  

संमोहनाच्या तीन अवस्था आहेत.
१. प्राथमिक अवस्था: हि अवस्था मंजे हलकी गुंगीची अवस्था आसते. तुम्ही संमोहनात असून सुद्धा पूर्णपणे शुद्धीत असता. ह्यामध्ये संमोहित व्यक्तीला संमोहनातून बाहेर आल्यावर सर्व काही आठवत आसते. 
२. मध्यम अवस्था: प्राथमिक अवस्थेच्या अधिक वरच्या पातळीवरची हि अवस्था आसते. ह्यामध्ये शरीरा च्या सर्व हालचाली बंद झालेल्या आसतात. मन बऱ्या पैकी एकाग्र झालेले आसते. बाहेरच्या कुठल्याही गोष्ठी पासून मन विचलित होत नाही.
३. गाढ अवस्था: हि गाढ निद्रेसारखी अवस्था असते. आजूबाजूची कोणतीही जाणीव सहसा राहत नाही. मनाला खूप आनंद आणि समाधान वाटत आसते.

संमोहन सर्वांवर होते का? शास्त्र असे म्हणते की ३०% लोक संमोहनाच्या पहिल्या अवस्थेत जातात,३०% लोक दुस-या अवस्थेत जातात व फक्त १०% लोक गाढ अवस्थेत जातात. उर्वरित ३०% लोक संमोहनात जातच नाहीत. पण लोकांच्या मनातील संमोहानाबद्दलची भीती व गैरसमज दूर केल्यास, त्यांना हे शास्त्र पटवून दिल्यास जवळ जवळ ९०% लोक संमोहनात जाऊ शकतात. अर्थात प्रत्येक वेळी अशीच परिस्थिती असेलच असे मुळीच नाही.
  
संमोहन करणाऱ्यांचे दोनप्रकार आजही दिसून येतात एक म्हणजे फक्त शास्त्र म्हणून मानणारे व दुसरे अध्यात्मिक शास्त्र म्हणून मानणारे.अध्यात्म मानणारे संमोहन तज्ञ सूचनांच्या प्रभावाबरोबरच संमोहन कर्त्याची इच्छाशक्ती, हातातून प्रवाहित होणारे संमोहन तरंग अर्थात पासेस, ओंकार, ध्यान-धारणा, त्राटक, प्राणायाम याबाबिना महत्व देतात; या उलट फक्त शास्त्र म्हणून मानणारे या बाबींना मानतच नाहीत. ते फक्त सूचनांचा प्रभावच मानतात.

संमोहनाचेही दोन भाग आहेत
  1. आत्मसंमोहन अर्थात स्वसंमोहन जे स्वतःपुरते मर्यादित आहे
  2. परासंमोहन अर्थात दुसऱ्यावर संमोहन करणे.



संमोहानाबाबत सर्वात महत्वाची बाब म्हणजे संमोहनात नेणाऱ्या पेक्षा संमोहनात जाणाऱ्यावर अधिक अवलंबून असते. ज्यांच्या मनाची एकाग्रता, सूचना ग्रहण क्षमता, सकारात्मक विचार, आत्मविश्वास व इच्छाशक्ती चांगली ते सर्व संमोहनात सहज चांगल्या गाढ अवस्थेत जाऊ शकतात. या उलट चंचल, भित्र्या मनाच्या, नकारात्मक विचारांच्या, आत्मविश्वास नसलेल्या दुबळया मनाच्या व्यक्तींवर संमोहन तितकेसे चांगल्याप्रकारे होत नाही.