Wednesday, February 24, 2016

विद्यार्थ्यांसाठी संमोहन एक परीस

आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे विद्यर्थीदशा असते. तसे आपण आयुष्यभर विद्यार्थीच असतो पण शालेय जीवन हे आपल्या आयुष्यतील महत्वाचे अंग आसते. शालेय जीवन हा फार मोठा काळ आहे. याच काळात आपण वयाच्या वेगवेगळ्या अवस्थेतून जात असतो.  याच काळात आपल्या जीवनाची, आयुष्याची जडण घडण होत असते. आपला स्वभाव, आपल्यातील गुण, अवगुण, जीवनाचे वेगवेगळे पैलू विकसित होत असतात. एकंदर पुढील आयुष्याच्या उभारणीसाठी हा काळ खूप महत्वाचा असतो. विद्यर्थीदशेतच शारीरिक बदलासोबत होणारे मानसिक बदल आपल आयुष्य बदलवून टाकतात.
माझ्या कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांशी बोलताना अनेक गोष्टी लक्षात येतात. सर्वसाधारण विद्यार्थांच्या समस्या ह्या समान असतात जसे अभ्यासात लक्ष न लागणे, एकाग्रता नसणे, वाचलेले लक्षात न राहणे, चंचल मन, न्यूनगंड, अबोल स्वभाव, वाईट सवयी, भीती, ताण तणाव अश्या कितीतरी ... बऱ्याच वेळा कमी आत्मविश्वास किंवा इतर कुठल्यतरी कारणांमुळे होणारी कुचंबना मुलांना वाईट संगतीकडे ओढत नेते. त्यापायी कितीतरी मुले व्यसनाधीन झालेली असतात. पालकांना याची कल्पना पण नसते. माझ्याकडे आलेल्या पालकांची आपल्या मुलांबाबत कमी अधिक प्रमाणात ह्याच तक्रारी असतात.
आजपर्यंत  बऱ्याच पालकांनी आणि विद्यार्थांनी माझ्या कार्यशाळेत भाग घेऊन संमोहनाचा लाभ घेतलेला आहे. १० विचा किंवा १२ विचा निकाल लागला कि  मिठाई घेऊन येणारे, फोन करणारे पालक व विद्यार्थी पहिले कि मन प्रसन्न होऊन जाते. वर्गात जेमतेम पास होणारा मुलगा, उत्तम मार्गांनी पास झाल्याचे पालक अन्दाने सांगतात. भाषण  देण्याची भीती  वाटते सांगनारे मुले आज मोठ्या कंपनी मध्ये ट्रेनर म्हणून नौकरी करत आहेत. आत्मविश्वास वाढला असे सांगणाऱ्या मुलांचे फोन आल कि फार संतोष वाटतो.  व्यक्तिमत्व विकाससाठी संमोहन हे एक परिस आहे. संमोहनाद्वारे एकग्रता वाढवणे, स्मरणशक्ती विकसित करणे, भीती घालवणे, वाईट सवयींवर मत करणे अगदी सहज शक्य आहे. संमोहनातून आपले मनोबल वाढवणे अगदी सहज शक्य आहे कारण संमोहनात दिलेली प्रत्येक सूचना थेट अंतर्मनात उतरत असते.

No comments:

Post a Comment