Thursday, February 11, 2016

संमोहन आणि मनाची एकाग्रता


आपल मन खूप चंचल आसते. ते कधीच एका विचारांवर / एका निर्णयावर टिकत नाही. एका दिवसात कमीत कमी सर्व साधारणपणे दहा हजार विचार आपल्या मनात येत असतात. नेहमीच आपण काम एक करतो आणि विचार वेगळा करतो. कुठलेही काम करताना मनाची एकग्रता साधता आली तर, काम कमी वेळेत यशस्वीरित्या पूर्ण करता येते. काम करताना होणाऱ्या चुका टाळता येतात. त्या कामातील बारकावे लक्ष्यात राहता. विद्यार्थ्यांना  अभ्यास करताना मनाची एकाग्रता साधता आली तर आयुष्यात यश तुमचेच आहे. विद्यार्थ्यांनसाठी संमोहन हे एखाद्या परिससारखे काम करते. एकग्रतने केलेल्या अभ्यासाचे फायदे सांगायची गरज नाही.

फक्त मनाच्या चंचलतेमुळे आपले कितीतरी नुकसान होत असते. मनाची एकग्रता वाढवण्यासाठी खूप व्यायाम आहेत,  पण संमोहन हि सर्वात  सोपी पद्धत आहे. यांचे कारण म्हणजे संमोहनात थेट अंतर्मनालाच  सूचना दिल्या जातात. रोज स्वसंमोहनात जाउन एकाग्रतेसाठी सूचना घेतल्यास आपल्याला लवकरच खूप सुधारणा झालेली जाणवेल. शिवाय डोळे उघडे ठेऊन स्वसंमोहनात राहता आले तर पूर्ण एकाग्रतेने अभ्यास किंवा काम होईल.

माझ्या कार्यशाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना संमोहनाचा झालेला लाभ मी नेहमीच अनुभवतो. तसेच वाईट सवयींवर मात करण्यासाठी सुद्धा संमोहनाचा खूप फायदा होतो.

रोज रात्री झोपताना " दिवसेंदिवस माझ्या मनाची एकग्रता वाढत जाईल " हे वाक्य पुटपुटत झोपलात तरी तुम्हाला त्याचा फायदा जाणवेल. कारण झोपेत असताना आपले बाह्यमन झोपलेले असते पण अंतर्मन पूर्ण जागे असते.  त्यामुळे तो विचार थेट अंतर्मनात पोहोचतो.

No comments:

Post a Comment