Thursday, September 1, 2016

विचार धन

'वेळ' आणि 'अनुभव' यापेक्षा मोठे 'गुरू' नाहीत. आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती 'शांत' राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे थेंबे' संचयच करावा लागतो. 

तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची 'प्रगल्भता' असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते. शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दुष्टीने चांगले असु शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कुष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ''माणसाने स्व:ताच्या नजरेत चांगल असलं पाहिजे,, ''लोक तर देवाला पण नावं ठेवतात."
        

No comments:

Post a Comment